________________
चमत्कार
ठिकाणी तर असेच असते ना की, 'मी करत आहे', असे लिहीले असेल ते पुस्तक अहंकारींना सोपवून द्यावे. जर मोक्षाला जायचे असेल तर ते पुस्तक आपल्याजवळ ठेवू नये. 'मी असे करतो आणि मी तसे करतो, मी तारतो आणि मी बुडवतो.' ह्या सगळ्या अहंकाराच्या गोष्टी आहेत. बाकी कोणात काही करण्याची शक्तिच नाही ना! हे तर असे आहे की ही साधीभोळी प्रजा, म्हणून असे सर्व चालते!!
म्हणजे हे संत तर म्हणतील, 'मरणे आमच्या स्वाधीन आहे, आम्हाला जेव्हा मरायचे असेल तेव्हा आम्ही मरू', अरे, एक मिनिट सुद्धा अशी कोणाची ताकद नाही! हे तर मूर्ख लोकांना फसवत असतात! म्हणून मला असेच वाटेल ना की कुठपर्यंत तुम्ही असे मूर्ख बनून रहाल? भगवान महावीर सांगतात, 'हे देवता, असे कधी घडले नाही, घडत नाही आणि घडणारही नाही.' आणि हे लोक तर पाहा, लोकांची श्रद्धा बसावी म्हणून सांगतात. 'मी एवढे आयुष्य वाढवले!' पण मग थोड्या दिवसानंतर ही बसलेली श्रद्धा पण निघून जाते! सुशिक्षीत माणसाला यात शंका-कुशंका तर होणारच ना. मग ती खरी श्रद्धा म्हटली जाईल का?
पण तिकिट चिकटतच नाही ना! ___ गुरु प्रत्यक्ष हजर असतील तरच काम होईल, नंतर कामास येत नाही. तरी देखील त्यांचे फॉलोअर्स (अनुयायी) पुस्तकात काय लिहितात? 'आमच्या गुरुंनी असे केले आणि तसे केले!' सर्व खोटे-खोटे चमत्कार लिहितात. ज्यास लहान मुले सुद्धा असे म्हणतील की हा वेडेपणा केला आहे, असे चमत्कार लिहितात! त्यास या काळातील मुले तर मानणारच नाहीत ना! पूर्वीच्या काळातील लोक चमत्कारास मानत होते.
प्रश्नकर्ता : पण दादा, हिंदुस्तानात तर सर्वच लोक चमत्काराला मानतात ना! मग तो कोणीही असो, बॅरिस्टर, डॉक्टर, इंजिनियर सर्वच मानतात.
दादाश्री : ते सर्व लालची आहेत म्हणूनच मानतात. नाहीतर चमत्कारासारखी गोष्ट ह्या जगात नसतेच. आणि जो काही चमत्कार