Book Title: Sarth Mahabharat Subhashitani
Author(s): Vishnu Vinayak Paranjape, Chintaman M Paranjape
Publisher: Keshav Bhikhaji Dhavle
View full book text
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सार्थश्रीरामायणसुभाषितानि
२४१ न स संकुचितः पन्था येन वाली हतो गतः।
समये तिष्ठ सुग्रीव मा वालिपथमन्वगाः ॥४।३०८१ ( राम लक्ष्मणाला म्हणतो, तूं सुग्रीवाकडे जाऊन त्याला असें सांग की,) माझ्याकडून वध पावलेला वाली ज्या मार्गाने गेला, तो मार्ग काही अगदी संकुचित नाहीं, (वाली जात असतांना तुलाही त्याच्या बरोबर जातां येईल, इतका तो मोठा आहे.) म्हणून आपल्या वचनाविषयों खबरदार रहा. आणि वालीच्या मार्गाला जाऊ नकोस. २४२ न साम रक्षस्सु गुणाय कल्पते
न दानमर्थोपचितेषु युज्यते । न भेदसाध्या बलदर्पिता जनाः
पराक्रमस्त्वेष ममेह रोचते ॥ ५॥४१॥३ (लंकेंत शिरल्यावर मारुति विचार करतो.) या राक्षसांचे ठिकाणी सामाचा काही उपयोग होणार नाही. जे धनसंपन्न असतात, त्यांच्या ठिकाणी दानाचा उपयोग होत नाहीं; जे लोक बलाने गर्विष्ठ असतात, ते भेद उपायाने साध्य होत नसतात. ( या राक्षसांना जिंकण्याकरितां) पराक्रमाचीच योजना करणे मला इष्ट वाटते. २४३ न साना शक्यते कीर्तिने साना शक्यते यशः।
प्राप्तुं लक्ष्मण लोकस्मिञ्जयो वा रणमूर्धनि॥६।२१।१६ (राम म्हणतो) हे लक्ष्मणा, सामोपायाने ( देशांतरीं) कीर्ति होत नाही, किंवा ( स्वदेशीही ) यश प्राप्त होत नाही तसेच इहलोकी रणांगणावर जयही सामोपचारानें प्राप्त होत नाही. २४४ न सा सभा यत्र न सन्ति वृद्धा
वृद्धा न ते ये न वदन्ति धर्मम् । नासौ धर्मो यत्र न सत्यमस्ति
न तत्सत्यं यच्छलेनानुविद्धम् ॥ ७.५९ प्र. ३३३३ जीमध्ये वृद्धमंडळी नाही, ती सभा नव्हे; जे धर्माला अनुसरून बोलत नाहीत ते वृद्ध नव्हेत; ज्यामध्ये सत्य नाहीं तो धर्म नव्हे; आणि ज्यांत कपट आहे, तें सत्य नव्हे.
For Private And Personal Use Only