Book Title: Sarth Mahabharat Subhashitani
Author(s): Vishnu Vinayak Paranjape, Chintaman M Paranjape
Publisher: Keshav Bhikhaji Dhavle
View full book text
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सार्थश्रीरामायणसुभाषितानि
२९८ परान्तकाले हि गतायुषो नरा
हितं न गृह्णन्ति सुहृद्भिरीरितम् ॥६।१६।२७ ज्यांचे आयुष्य संपले आहे असे पुरुष सुहृदांनी केलेले हितकारक भाषण अंतकाली ऐकून घेत नाहीत. २९९ परिमृष्टो दशान्तेन दशाभागेन सेव्यते ॥ ३७२।८
(सुग्रीव तुझ्या सारखाच दुःखी आहे त्याच्याशी तूं सख्य कर, असें कबंधाने रामाला सांगितले. ) जो ग्रहदशेच्या फेन्यांत सांपडला आहे, त्याला ग्रहदशेच्या फेन्यांत सांपडलेल्याचीच मदत होत असते. ३०० पापानुबन्धो वै यस्य कर्मणः को नु तत्पुमान् । ___ कुर्वीत लोकाधिपतिः स्वयंभूर्भगवानपि ॥ ३५१३३२
(जटायु रावणाला म्हणतो.) ज्याचा परिणाम चांगला नाही तें कर्म प्रत्यक्ष लोकाधिपति भगवान् ब्रह्मदेवही जरी झाला, तरी कोणता बरें ( कल्याणेच्छु) पुरुष करण्यास प्रवृत्त होईल ? ३०१ पिता हि दैवतं तात देवतानामपि स्मृतम् ॥ २॥३४५२
(राम दशरथाला म्हणतो.) बाबा, देवतांना सुद्धा पिता हेच दैवत म्हणून म्हटले आहे. ३०२ पितुर्हि वचनं कुर्वन कश्चिन्नाम हीयते ॥ २॥२१॥३७ .
पितृवाक्याचे पालन करणारा कोणीहि हानि पावत नाही. ३०३ पितुर्हि समतिकान्तं पुत्रो यः साधु मन्यते ।
तदपत्यं मतं लोके विपरीतमतोऽन्यथा ॥२।१०६।१५ (भरत रामाला म्हणतो.) पित्याच्या हातून कांहीं अतिक्रम झाला असतां जो पुत्र तो सुधारून घेतो, त्यालाच लोकांमध्ये अपत्य म्हणून म्हणतात. याच्या उलट वागणारास अपत्य म्हणत नाहीत.
For Private And Personal Use Only