Book Title: Pati Patnicha Divya Vyavhar
Author(s): Dada Bhagwan
Publisher: Dada Bhagwan Aradhana Trust

View full book text
Previous | Next

Page 110
________________ पति-पत्नीचा दिव्य व्यवहार आणि सांगितले की आम्ही तुमच्या सोबत संसार मांडणार नाही. त्यावर त्या म्हणाल्या की, तसे नाही, आम्हाला फक्त एक पुत्रदान आणि एक पुत्री दान द्या. अर्थात् ह्या दोन दानापुरतेच सोबत, त्यानंतर कुठलीही संगत नाही. त्यानंतर संसारात आमची तुमच्यासोबत फक्त फ्रेंडशीप (मैत्री). म्हणून त्यांनी हे स्वीकारले. आणि त्या मित्रासारखेच रहात होत्या, पत्नी बनून रहात नव्हत्या. ऋषिपत्नी घरातील सर्व कामे सांभाळत आणि ते बाहेरील कामे शांभाळायचे, नंतर दोघेही एकत्र भक्ती करण्यासाठी बसत असत. पण आता तर (विषयविकार) हा सर्व धंदाच झाला आहे म्हणून बिघडले आहे सर्व. ऋषिमुनि तर नियमवाले होते. आता एक पुत्र किंवा एक पुत्रीसाठी लग्न केले तर हरकत नाही. त्यानंतर मित्रासारखे राहिलात, तर ते दु:खदायी होणार नाही. पण हे तर सुख शोधतात तर मग असेच होणार ना! दावाच करतात ना! ऋषिमुनि खूप वेगळ्या प्रकारचे होते. एक पत्नीव्रत पाळणार ना? तेव्हा म्हणतात, 'पाळणार'. तेव्हा तुमचा मोक्ष आहे आणि जर का दुसऱ्या स्त्री बद्दल जरासाही विचार आला तर मोक्ष टळला. कारण की ते बिनहक्काचे आहे. हक्काचे तिथे मोक्ष आणि हक्काशिवाय असलेले ती पशुता अर्थात जनावरगती. विषयविकाराची पण मर्यादा असायला हवी. स्त्री-पुरुषात विषयविकार कुठपर्यंत असायला हवा? तर परस्त्री नको आणि परपुरुषही नको. आणि त्यातून कधी त्यांचा तसा विचार आला तर ते लगेचच प्रतिक्रमणने धुवून टाकायला हवे. सर्वात मोठी जोखीम असेल तर हीच, परपुरुष आणि परस्त्री! स्वत:ची स्त्री जोखीम नाही. आता ह्यात आमची काय चुक आहे? आम्ही ओरडतो का कधी? ह्यात काही गुन्हा आहे का? ही आमची सायन्टिफिक शोधखोळ आहे ! नाहीतर साधूंना तर इतपर्यंत सांगण्यात येते की, स्त्रीचा लाकडी पुतळा असेल त्याला देखील पाहू नका. स्त्री बसली असेल त्या ठिकाणी बसू देखिल नका. पण मी तसा आग्रह केला नाही ना? ह्या काळात एकपत्नीव्रतला आम्ही ब्रह्मचर्य म्हणतो आणि तीर्थंकर

Loading...

Page Navigation
1 ... 108 109 110 111 112 113 114 115 116 117 118 119 120 121 122 123 124 125 126