SearchBrowseAboutContactDonate
Page Preview
Page 118
Loading...
Download File
Download File
Page Text
________________ आत्मदृष्टी झाल्यानंतर... तर तिथे तुम्हाला रागावण्याची गरज नव्हती. तुम्ही याचा पश्चाताप केला पाहिजे. पण आता समजल्याशिवाय असेच पश्चाताप करु शकत नाही. गुन्हा दिसत असेल पण गुन्हा सिद्ध झाल्याशिवाय पश्चाताप कसा करु शकेल? ते सिद्ध झाले पाहिजे की अरे, हा तर माझ्याच कर्माचा उदय आहे. म्हणजे अशी समज असली पाहिजे. आता जर कोणी मला चापट मारली तर मी लगेचच त्याला आशिर्वाद देईन. याचे काय कारण असेल? तो चापट मारतो का? या जगात कुणीही कुणाला चापट मारु शकत नाही. पूर्वी तर मी बक्षिस ठेवले होते. आजपासून तीस वर्षांपूर्वी भारतात मी बक्षिस ठेवले होते की, जो मनुष्य मला मारेल त्याला मी पाचशे रुपये रोख देईन. पण मला कोणीही मारणारा भेटला नाही. कोणी दुःखी असेल तर 'भाऊ, दुःखामुळे तू कुणाजवळ उसने पैसे मागत असशील त्यापेक्षा तू माझ्याकडून हे पाचशे रुपये घेऊन जा ना!' तेव्हा तो म्हणेल, 'नाही रे बाबा. उसने मागितलेले परवडेल पण तुम्हाला चापट मारुन माझी काय अवस्था होईल? हे जग पूर्णपणे नियमशीर चालते. देव चालवित नाही तरी पण स्ट्रॉग नियमानुसार आहे. देवाच्या हजेरीमुळे हे जग चालते. म्हणून तुमच्याशी कोणी दोष करत असेल (त्रास देत असेल) तर, तो तुमचाच प्रतिध्वनी आहे. जगात कुणाचाही दोष नसतो. मला संपूर्ण जगातील जीवमात्र निर्दोषच दिसतात. हे जे दोषी दिसतात, तीच भ्रांति आहे. आपले विज्ञान असे सांगते की तुम्हाला कोणत्याही व्यक्तीचा दोष दिसतो तो तुमचाच दोष आहे. तुमच्याच दोषाचे रिअॅक्शन (प्रत्याघात) आलेले आहे. आत्माही वीतराग आहे आणि प्रकृती सुद्धा वीतराग आहे. पण तुम्ही जितके दोष बघाल तितके त्याचे रिअॅक्शन येईल. तेव्हा दोष होतात ते डिस्चार्ज रुपाने... सर्व निर्दोषच आहेत. दोषी दिसतात तोच आपला दोष आहे,
SR No.034333
Book TitleThe Flawless Vision Marathi
Original Sutra AuthorN/A
AuthorDada Bhagwan
PublisherDada Bhagwan Aradhana Trust
Publication Year
Total Pages176
LanguageMarathi
ClassificationBook_Other
File Size1 MB
Copyright © Jain Education International. All rights reserved. | Privacy Policy