SearchBrowseAboutContactDonate
Page Preview
Page 42
Loading...
Download File
Download File
Page Text
________________ निजदोष दर्शनना ने...निर्दोष मागत राहावी. पावलोपावली जागृती राहिली पाहिजे. आपल्यातील क्रोधमान-माया-लोभाचे कषाय आपल्याकडून चुका करवून पुन्हा उधारी करवतात, असाच आपला माल आहे. त्या चुका करवतातच आणि उधारी उभी करतात पण त्यावेळी आपण लगेचच, त्याचक्षणी माफी मागून जमा करुन स्वच्छ करुन टाकावे. हा व्यापार पेन्डिंग ठेवू नये. हा तर दरअसल रोख व्यापार म्हटला जाईल. प्रश्नकर्ता : आत्ता ज्या चुका होत आहेत त्या मागील जन्माच्या आहेत ना? दादाश्री : मागील जन्माच्या पापांमुळेच या चुका आहेत. पण पुन्हा या जन्मात चुका संपवतच नाहीत आणि वाढवतच जातात. चूक संपवण्यासाठी चुकीला चूक म्हणावे लागते. तिचे रक्षण करु नये. ही ज्ञानी पुरुषांची चावी आहे. या चावीने कुठलेही कुलूप उघडले जाते. ___ ज्ञानी पुरुष तुमच्या चुकांसाठी काय करु शकतात? तर ते फक्त तुमची चूक तुम्हाला दाखवतात, प्रकाश धरतात आणि मार्ग दाखवतात की चुकांचे रक्षण करु नका. परंतु जर चुकांचे रक्षण केले की, 'आपल्याला तर या जगात राहायचे आहे, तर असे कसे करु शकतो?' अरे, बाबा, ! असे चुकांना पोषण देऊन त्यांचे रक्षण करु नकोस. एक तर चूक करतोस आणि वरुन कल्पांत करतोस म्हणून कल्पच्या अंतापर्यंत (काळचक्र संपेपर्यंत) राहावे लागेल! __ चूक ओळखू लागला म्हणजे चूक संपते. कित्येक लोक कापड (विकण्यासाठी माप घेताना) ताणून-ताणून मापतात आणि वरुन सांगतात की, आज तर पाव मीटर कापड कमी दिले. एक तर हे एवढे मोठे रौद्रध्यान आणि परत त्याचे रक्षण? चुकांचे रक्षण करायचे नसते. तूप विकणारा कुणाच्याही लक्षात येणार नाही अशा प्रकारे तुपात भेसळ करुन पाचशे रुपये कमावतो. तो तर मुळासकट वृक्ष लावतो. स्वत:च स्वत:चे अनंत जन्म बिघडवून टाकतो.
SR No.034333
Book TitleThe Flawless Vision Marathi
Original Sutra AuthorN/A
AuthorDada Bhagwan
PublisherDada Bhagwan Aradhana Trust
Publication Year
Total Pages176
LanguageMarathi
ClassificationBook_Other
File Size1 MB
Copyright © Jain Education International. All rights reserved. | Privacy Policy