SearchBrowseAboutContactDonate
Page Preview
Page 56
Loading...
Download File
Download File
Page Text
________________ मृत्यूवेळी, आधी आणि नंतर एक-दोन जन्म. पण त्यानंतर सीमंधर स्वामीं जवळच जावे लागेल. हा इथला धक्का, इथला हिशोब आधीच बांधला गेला आहे, थोडा चिकट झाला आहे, पण तो पूर्ण होऊन जाईल. त्यापासून सुटकाच नाही ना. प्रश्नकर्ता : प्रतिक्रमण केल्याने कर्माचे धक्के कमी होतात ? दादाश्री : कमी होतात ना! आणि लवकर संपूष्टात येईल. 'आम्ही' असे केले निवारण विश्वासोबत 45 जितक्या चुका संपविल्या प्रतिक्रमण करता करता, तितका मोक्ष जवळ आला. प्रश्नकर्ता : त्या फाईली परत तर चिकटणार नाहीत ना, दुसऱ्या जन्मात ? दादाश्री : कशासाठी ? आपल्याला दुसऱ्या जन्मात कशाला ? इथल्या इथेच इतके सारे प्रतिक्रमण करुन टाका. वेळ मिळाला की त्यासाठी प्रतिक्रमण करतच राहिले पाहिजे. 'चंदूभाऊ 'ला 'तुम्ही' एवढेच सांगायला पाहिजे की प्रतिक्रमण करतच रहा. तुमच्या घरातील सगळ्या सदस्यांना पूर्वी तुमच्याकडून काही ना काही दुःख झाले असे त्यासाठी तुम्ही प्रतिक्रमण करावे. संख्यात अथवा असंख्यात जन्मांपासून जे राग-द्वेष, विषय, कषायचे दोष केले असतील, त्याची क्षमा मागतो. असे रोज एकएक व्यक्तिचे, असेच घरातील प्रत्येक व्यक्तिला आठवून करायला पाहिजे. नंतर आसपासचे, शेजारी-पाजारी सगळ्यांना आठवून उपयोग ठेवून हे करायला पाहिजे. तुम्ही असे केल्यानंतर हे ओझे हलके होत जाईल. असेच काही हलके होणार नाही. आम्ही पूर्ण विश्वासोबत अशा प्रकारे निवारण केले आहे. आधी असे निवारण केले होते तेव्हाच तर सुटका झाली. जोपर्यंत आमचा दोष तुमच्या मनात आहे तोपर्यंत मला चैन पडणार नाही. म्हणून आम्ही जेव्हा असे प्रतिक्रमण करतो तेव्हा तिथे पुसला जातो.
SR No.034044
Book TitleDeath Before During and After Marathi
Original Sutra AuthorN/A
AuthorDada Bhagwan
PublisherDada Bhagwan Aradhana Trust
Publication Year2018
Total Pages62
LanguageMarathi
ClassificationBook_Other
File Size1 MB
Copyright © Jain Education International. All rights reserved. | Privacy Policy