SearchBrowseAboutContactDonate
Page Preview
Page 54
Loading...
Download File
Download File
Page Text
________________ मृत्यूवेळी, आधी आणि नंतर बनतो. म्हणून या देहात आपल्याला ज्ञानी पुरुष भेटले आहेत तर पूर्णसंपूर्ण काम काढून घ्या. पूर्ण तार जोडून तडीपार उतरुन जा. अजन्म - अमरला आवागमन कसे असणार ? प्रश्नकर्ता: परंतु आवागमनाचा फेरा कोणाला आहे ? दादाश्री : जो अहंकार आहे ना, त्याला आवागमन आहे. आत्मा तर मूळ दशेतच आहे. अहंकार मग बंद होतो. म्हणून त्याचे फेरे बंद होऊन जातात! 43 मग मृत्यूचीही भीती नाही प्रश्नकर्ता : मात्र ही सनातन शांती प्राप्त केली तर ती या जन्मापूरतीच असते की जन्म-जन्मांपर्यंत असते ? दादाश्री : नाही. ती तर परमनन्ट झाली. मग कर्ताच राहिला नाही, म्हणून कर्मबंधन नाही. एक किंवा दोन जन्मांनंतर मोक्ष होतोच. सुटकाच नाही. चालतच नाही. ज्याला मोक्षाला जायचे नसेल, त्याने हा धंदा करायचा नाही. या लाईनीत पडायचेच नाही. ज्याला मोक्ष पसंत नाही, त्याने या लाईनीत पडायचेच नाही. प्रश्नकर्ता : हे सगळे ज्ञान आहे, ते दुसऱ्या जन्मात गेल्यावर आठवते का ? दादाश्री : सर्वकाही त्या रुपातच असणार. बदलणार नाही. कारण की कर्म ( नवीन) बांधले जात नाहीत, म्हणून पुन्हा गुंता निर्माण होतच नाही. प्रश्नकर्ता : तर याचा अर्थ असा झाला की आमच्या मागील जन्माची अशी कर्म असतात, ज्यामुळे गुंता चालूच राहतो ? दादाश्री : मागील जन्मात अज्ञानतेने कर्म बांधले, त्या कर्मांचा हा इफेक्ट आहे. इफेक्ट भोगावेच लागतात. इफेक्ट भोगता भोगता जर ज्ञानी भेटले नाही, तर परत नवीन कॉजेस आणि परिणाम स्वरूप नवीन
SR No.034044
Book TitleDeath Before During and After Marathi
Original Sutra AuthorN/A
AuthorDada Bhagwan
PublisherDada Bhagwan Aradhana Trust
Publication Year2018
Total Pages62
LanguageMarathi
ClassificationBook_Other
File Size1 MB
Copyright © Jain Education International. All rights reserved. | Privacy Policy