SearchBrowseAboutContactDonate
Page Preview
Page 37
Loading...
Download File
Download File
Page Text
________________ मृत्यूवेळी, आधी आणि नंतर कितीतरी महात्म्यांचे मृत्यू झाले, त्या सगळ्यांना 'मी शुद्धात्मा आहे,' 'मी शुद्धात्मा आहे' असे भान राहत होते. गतीची निशाणी प्रश्नकर्ता : मृत्यूच्या वेळी अशी कोणती निशाणी आहे की ज्यामुळे समजेल की या जीवाची गती चांगली झाली की नाही? ____ दादाश्री : त्यावेळी 'माझ्या मुलीचे लग्न झाले की नाही? असे झाले नाही,' अशा कारणांनी सगळे घर जर डोक्यावर घेत असेल, उपाधी करत असेल, तर समजायचे की त्याची अधोगती झाली. आणि जर आत्म्यात राहत असेल अर्थात भगवंतांच्या नामात राहत असेल तर चांगली गती झाली. प्रश्नकर्ता : परंतु काही दिवस बेशुद्धीत असेल तर? दादाश्री : बेशुद्धीत असेल, तरीही आतून ज्ञानात असेल तर चालेल. हे ज्ञान घेतलेले असायला हवे. मग तो बेशुद्ध असला तरीही चालेल. __ मृत्यूची भीती प्रश्नकर्ता : तर सगळ्यांना मृत्यूची भीती का वाटत असते? दादाश्री : मृत्यूची भीती तर अहंकाराला असते. आत्म्याला काहीच नसते. भीती अहंकाराला असते की, मी मरुन जाईल. मी मरुन जाईल. ____ या दृष्टीने बघा तरी.... असे आहे ना, भगवंताच्या दृष्टीने या जगात काय चालले आहे? तेव्हा म्हणतात, 'त्यांच्या दृष्टीने कोणी मरतच नाही,' भगवंताची जी दृष्टी आहे ती दृष्टी जर आपल्याला प्राप्त झाली, एका दिवसासाठी त्यांनी ती दृष्टि आपल्याला दिली, तर इथे कितीही लोक मेले तरीही आपल्यावर त्याचा परिणाम होणार नाही. कारण भगवंताच्या दृष्टीने कोणी मरतच नाही.
SR No.034044
Book TitleDeath Before During and After Marathi
Original Sutra AuthorN/A
AuthorDada Bhagwan
PublisherDada Bhagwan Aradhana Trust
Publication Year2018
Total Pages62
LanguageMarathi
ClassificationBook_Other
File Size1 MB
Copyright © Jain Education International. All rights reserved. | Privacy Policy