SearchBrowseAboutContactDonate
Page Preview
Page 35
Loading...
Download File
Download File
Page Text
________________ 24 मृत्यूवेळी, आधी आणि नंतर प्रश्नकर्ता : अंतिम वेळेस कोणाला माहित की कान बंद होऊन जातील ? दादाश्री : अंतिम वेळेस तर आज जे आपल्या वहिखात्यात जमा आहे ना, ते समोर येते. मृत्यू वेळीचा तास, जे गुणस्थान ये ना, ते सार आहे आणि तो ताळेबंदी हिशोब फक्त संपूर्ण जीवनाचा नाही, परंतु आधी जो जन्म घेतला आणि नंतरचा, या मधल्या भागाचा हिशोब आहे. मृत्यूवेळी लोक कानामध्ये बोलतात की, 'बोला राम, बोला राम' अरे मुर्खा राम का बोलावतो आहेस ? राम तर गेले कधीचे ! पण लोकांनी असे शिकवले की असे काहीतरी करावे. परंतु ते तर आत पुण्य जागे असेल तरच अॅडजेस्ट होते. आणि तो मरणारा तर मुलीच्या लग्नाच्या चिंतेतच पडलेला असतो. या तीन मुलींचे लग्न झाले आणि ही चौथी राहून गेली. या तिघी विवाहित झाल्या पण ही धाकटी तेवढी राहिली. रक्कम मांडली की मग ती पुढे येऊन उभी राहते. आणि ते लहानपणी चांगले केलेले येणार नाही, पण म्हातारपणी चांगले केलेले येईल. निसर्गाचा किती सुंदर कायदा म्हणजे येथून जातो, तो सुद्धा निसर्गाचा न्याय, ठीक आहे ना ! परंतु वीतराग सावधान करतात की भाऊ, पन्नास वर्षे झाली आता सावध हो ! पंच्याहत्तर वर्षाचे आयुष्य असेल तर पन्नास वर्षात पहिला फोटो निघतो आणि साठ वर्षाचे आयुष्य असेल, तेव्हा चाळीसाव्या वर्षी फोटो निघतो. एक्यांशी वर्षाचे आयुष्य असेल तर चौपनाव्या वर्षी फोटो निघून जातो. परंतु तोपर्यंत इतका टाइम फ्री ऑफ कॉस्ट (मोफत) मिळतो, दोन तृतीयांश हिस्सा फ्री मध्ये मिळतो आणि एक तृतीयांश भागात त्याचा मग फोटो निघत राहतो. कायदा चांगला आहे की जोर-जबरदस्तीवाला आहे ? जोर-जबरदस्तीवाला नाही ना ? न्यायसंगत आहे ना ? दोन तृतीयांश भागात
SR No.034044
Book TitleDeath Before During and After Marathi
Original Sutra AuthorN/A
AuthorDada Bhagwan
PublisherDada Bhagwan Aradhana Trust
Publication Year2018
Total Pages62
LanguageMarathi
ClassificationBook_Other
File Size1 MB
Copyright © Jain Education International. All rights reserved. | Privacy Policy