SearchBrowseAboutContactDonate
Page Preview
Page 33
Loading...
Download File
Download File
Page Text
________________ मृत्यूवेळी, आधी आणि नंतर तर मी त्याला समजावतो. आसपासचे कॉजेस (कारणे), सर्कल, आत्महत्या करण्यासारखे आहे की नाही, हे सर्व त्याला समजावत आणि परत फिरवत. 22 आत्महत्येचे फळ प्रश्नकर्ता: एखादा मनुष्याने आत्महत्या केली तर त्याची गती काय होते ? भूत-प्रेत बनतो ? दादाश्री : आत्महत्या केल्याने प्रेत बनतो आणि प्रेत बनून भटकावे लागते. म्हणजे आत्महत्या केल्यानंतर उलट त्रास वाढवून घेतो. एकदा आत्महत्या केली, त्यानंतर कितीतरी जन्मांपर्यंत त्याचा प्रतिध्वनी उमटत राहतो. आणि ही जी आत्महत्या करतो ते काही नवीन नाही करत. ते तर मागील जन्मी आत्महत्या केली होती, त्याच्या प्रतिध्वनीमुळे करतो. ही जी आत्महत्या करतो, ते तर मागच्या जन्मी केलेल्या आत्महत्या कर्माचे फळ येते. म्हणून आपल्या आपणच आत्महत्या करतो. हे असे प्रतिध्वनी पडलेले असतात की तसेच्या तसेच करत आलेला असतो. म्हणून आपल्या आपणच आत्महत्या करतो आणि आत्महत्या केल्यानंतर परत अवगतीवाला जीव होतो. अवगतीवाला म्हणजे देहाशिवाय भटकणारा जीव. भूत बनणे काही सोपे नाही. भूत तर देवगतीचा अवतार आहे, ती सोपी गोष्ट नाही. भूत तर येथे कठोर तप केले असतील, अज्ञान तप केले असतील, तेव्हाच भूत होतो आणि प्रेत, ही तर वेगळी वस्तू आहे. विकल्पाशिवाय जगता येत नाही प्रश्नकर्ता : आत्महत्येचे विचार का येत असतील ? दादाश्री : ते तर मनातील विकल्प संपलेले असतात म्हणून. विकल्पाच्या आधारावर मनुष्य जगतो. विकल्प संपले की मग आता काय करायचे, त्याचे काहीच दर्शन दिसत नाही. म्हणून मग आत्महत्या करण्याचा विचार करतो. म्हणजे हे विकल्प सुद्धा कामाचेच आहेत.
SR No.034044
Book TitleDeath Before During and After Marathi
Original Sutra AuthorN/A
AuthorDada Bhagwan
PublisherDada Bhagwan Aradhana Trust
Publication Year2018
Total Pages62
LanguageMarathi
ClassificationBook_Other
File Size1 MB
Copyright © Jain Education International. All rights reserved. | Privacy Policy