SearchBrowseAboutContactDonate
Page Preview
Page 26
Loading...
Download File
Download File
Page Text
________________ संघर्ष टाळा १७ निर्माण झाली आणि त्याने तसे नक्कीच केले, तर तेव्हा पासूनच तो समकित झाला! (समकित-शुद्धात्माचा लक्ष असलेली, सम्यक् दृष्टि) अर्थात् जर कोणाला समकित करायचे असेल तर आम्ही गॅरंटी देतो कि, घर्षण करायचे नाही असे नक्की करा म्हणजे समकित होईल! देहाचा संघर्ष झाला आणि घाव लागले, तर मलमपट्टी केल्याने बरे होऊन जाईल. परंतु घर्षण आणि संघर्षणाने जे मनात डाग पडलेले असतील, बुद्धिचे डाग पडले असतील तर त्याला कोण काढणार? हजार अवतार घेऊन सुद्धा हे डाग जाणार नाहीत. प्रश्नकर्ता : घर्षण आणि संघर्षाने मन-बुद्धि वर घाव पडतात का? दादाश्री : अरे! मनावर, बुद्धिवरच नाही संपूर्ण अंत:करणावर घाव होत राहतात आणि त्याचा परिणाम शरीरावर पडतो! म्हणून घर्षणाने तर किती तरी अडचणी निर्माण होतात. प्रश्नकर्ता : तुम्ही सांगता कि, घर्षणाने सर्व शक्ति संपून जाते. तर जागृतिमुळे शक्ति परत मिळविता येते का? दादाश्री : शक्ति खेचण्याची (मिळवीण्याची) आवश्यकता नाही, शक्ति तर आहेच. आता उत्पन्न होते. पूर्वी जे संघर्ष झाले होते आणि जी खोट गेली होती, तीच परत येते. पण जर आपण आता नवीन संघर्ष ऊभे केले तर परत शक्ति निघून जाते, आलेली शक्ति पण जाते आणि आपण संघर्ष होऊ दिले नाही तर शक्ति उत्पन्न होत राहते! ह्या जगात वैराने सुद्धा संघर्ष होते. संसाराचे मूळ बीज, वैर आहे ज्याचे वैर आणि संघर्ष बंद झाले त्याचा मोक्ष झाला! प्रेम नडत नाही, वैर संपला तर प्रेम उत्पन्न होते. कॉमनसेन्स, एवरीव्हेर एप्लिकेबल व्यवहार स्वच्छ होण्यासाठी काय हवे? 'कॉमनसेन्स' पूर्णपणे (संपूर्ण
SR No.030136
Book TitleSangharsh Tala
Original Sutra AuthorN/A
AuthorDada Bhagwan
PublisherDada Bhagwan Aradhana Trust
Publication Year2015
Total Pages38
LanguageMarathi
ClassificationBook_Other
File Size1 MB
Copyright © Jain Education International. All rights reserved. | Privacy Policy