SearchBrowseAboutContactDonate
Page Preview
Page 57
Loading...
Download File
Download File
Page Text
________________ ४४ प्रतिक्रमण ११. पुरुषार्थ, प्राकृत दुर्गुणांच्या समोर... राग-द्वेष शिवाय तर लाईफच नसेल कोणाची. जोपर्यंत ज्ञान मिळत नाही, तोपर्यंत राग आणि द्वेष हे दोनच होत रहातात. तिसरी वस्तुच नसते. प्रश्नकर्ता : पण दादाजी, द्वेष हे रागचेच पिल्लू आहे ना? दादाश्री : होय, ते पिल्लू त्याचे आहे, पण त्याचा परिणाम आहे, पिल्लू म्हणजे त्याचा परिणाम आहे. राग खूप झाला ना, ज्याच्यावर राग होत असतो ना, तो एक्सेस (अतिशय) होऊन जातो. तर परिणामस्वरूप त्याच्यावर जास्त द्वेष होतो मग. कोणतीपण वस्तु प्रमाणाच्या बाहेर जातेना,तर ती आपल्याला ना पसंद होते त्याचे नांव द्वेष. समजले? प्रश्नकर्ता : होय, समजले. दादाश्री : ते तर आपण समजून घ्यायला पाहिजे की आपलीच रीएक्शन आली आहे सर्व! आपण त्याला मानाने बोलावले असेल तरी आपल्याला वाटते की त्याचे तोंड वाकडे दिसत आहे, तेव्हा म्हणून आपण समजून जायचे की ही आपली रीएक्शन आहे. तर मग काय करायचे? प्रतिक्रमण करायचे. दुसरा उपाय नाही या संसारात. तेव्हा या संसाराचे लोक काय करतात? त्यावर मग आपले ही तोंड वाकडे करतात! म्हणजे पुन्हा होता तसा चा तसा उभा करतात. आपण शुद्धात्मा झालोत म्हणजे समजावूनउमजावून, आपली चुक एक्सेप्ट (स्वीकार) करून ही निवाडा आणा. आम्ही तर ज्ञानी पुरुष असून सुद्धा सर्व चुकांना एक्सेप्ट करून केस पूर्ण करीत असतो. प्रश्नकर्ता : इर्षा होत असते, ती होवू नये त्यासाठी काय करायचे ? दादाश्री : त्याचे दोन उपाय आहेत. इर्षा होवून गेल्यानंतर पश्चाताप करायचे. आणि दुसरे इर्षा होत आहे ती इर्षा तुम्ही नाही करत. इर्षा हे पूर्व जन्माचे परमाणु भरलेले आहे, त्याचा स्वीकार नाही करायचा, त्याच्यात तन्मयाकार नाही झालात, मग इर्षा उडून जाते. तुम्हाला इर्षा झाल्यावर पश्चाताप करायचे हे उत्तम आहे.
SR No.030130
Book TitlePratikraman
Original Sutra AuthorN/A
AuthorDada Bhagwan
PublisherDada Bhagwan Aradhana Trust
Publication Year2014
Total Pages114
LanguageMarathi
ClassificationBook_Other
File Size1 MB
Copyright © Jain Education International. All rights reserved. | Privacy Policy