SearchBrowseAboutContactDonate
Page Preview
Page 28
Loading...
Download File
Download File
Page Text
________________ प्रतिक्रमण दोष दिसत असतात. आता दुसऱ्याला नाही दिसत, त्याचे काय कारण? अजून कच्चे आहेत तेवढे, दिसत नाही म्हणून काय विना दोषाचा होऊन गेला आहे का? १५ भगवतांनी दररोज वहीखाता (आपल्या दोषांची नोंद) लिहायचे सांगितले होते, तर आता बारा महिन्याचे वहीखाते लिहितो, जेव्हा पर्युषण येते तेव्हा. भगवानांनी सांगितले की, खरा व्यापारी असशील तर दररोजचे लिहित जा आणि संध्याकाळी ताळेबंदी (हिशोब ) काढत जा. बारा महिन्यानी वहीखाता लिहीत आहे, मग काय आठवणार आहे? त्यात कोणती रक्कम आठवणार आहे? भगवानांनी सांगितले होते की खरा व्यापारी बनायचे आणि दररोजची वहीखाता दररोज लिहायची आणि वहीखात्यात कुठे भूलचुक झाली, अविनय झाला असेल तर त्वरितच्या त्वरित त्याचे प्रतिक्रमण करायचे, त्याला पुसून टाकायचे. ४. अहो, अहो! ते जागृत दादा ह्या जगात सर्व निर्दोष आहेत. पण पहा अशी वाणी निघत असते ना?! आम्ही तर या सर्वांना निर्दोषच पाहिले आहे, दोषीत एकही नाही. आम्हाला दोषीत दिसतच नाही. फक्त दोषीत बोलले जाते. आपण असे बोलून शकतो? आपल्याला असे बोलणे अनिवार्य आहे? असे कोणाबद्दल ही बोलायला नको. त्या नंतर त्वरितच त्याचे प्रतिक्रमण होत असतात. तेवढी आमची चार डिग्री कमी आहे, त्याचा हा परिणाम आहे. पण प्रतिक्रमण केल्याशिवाय चालणार नाही. आम्ही (समोरच्याचा दोष निघावा म्हणून) दखल करतो, जाणून बुजून कडक शब्द बोलतो परंतु निसर्गाच्या दृष्टिने तर दोषच झाला ना! तर आम्ही त्याचे प्रतिक्रमण (ए.एम. पटेलकडून) करवून घेतो. प्रत्येक चूकीचे प्रतिक्रमण होत असते. समोरच्याचे मन तूटणार नाही असे आमचे होत असते. माझ्याने ‘आहे' त्याला 'नाही आहे' असे नाही सांगितले जाणार आणि ‘नाही आहे' त्याला ‘आहे' असे नाही सांगितले जाणार. म्हणून माझ्याने बऱ्याच लोकांना दुःख होते. जर 'नाही आहे' त्याला 'आहे' असे मी
SR No.030130
Book TitlePratikraman
Original Sutra AuthorN/A
AuthorDada Bhagwan
PublisherDada Bhagwan Aradhana Trust
Publication Year2014
Total Pages114
LanguageMarathi
ClassificationBook_Other
File Size1 MB
Copyright © Jain Education International. All rights reserved. | Privacy Policy