SearchBrowseAboutContactDonate
Page Preview
Page 96
Loading...
Download File
Download File
Page Text
________________ पति-पत्नीचा दिव्य व्यवहार होऊ लागले. मग त्या बाईने मला सांगितले की 'हे असे आहेत, मी काय करु? मला पळून जायचे आहे !' मी म्हणालो, एक पत्नीव्रताचा कायदा पाळत असेल असा भेटला तर पळून जा, नाहीतर दुसरा कोण चांगला मिळणार आहे? तसे तर पतीने एकच ठेवली आहे ना? तेव्हा म्हणाली, 'हो एकच आहे.' तेव्हा मी म्हाणालो, 'खूप चांगले. लेट गो कर (चालवून घे). मोठे मन कर. तुला ह्याहून चांगला दुसरा नाही मिळणार.' कलियुगात तर पतीही चांगला मिळत नाही. आणि पत्नीही चांगली मिळत नाही. हा सर्व कचरा मालच आहे ना! माल पसंद करण्यासारखा नाहीच. म्हणून तुला ते पसंत करायचे नाही, तर तुला त्याचा निकाल लावायचा आहे. कर्माचा हा हिशोब फेडून टाकायचा आहे म्हणून या सर्वाचा निकाल लाव. तेव्हा लोकं तर खुशाल मालक-मालकीन बनायला मागतात. अरे मुर्खा, इथूनच निकाल लाव ना. कसेही करुन क्लेश कमी होईल, अश्याप्रकारे निकाल लावायचा आहे. प्रश्नकर्ता : दादाजी, त्यांना असे संयोग मिळाले, तेही हिशोबानुसारच मिळाले असतील ना? दादाश्री : हिशोबाशिवाय तर हे मिळणारच नाही ना! संसार आहे तर घाव तर पडणारच ना? आणि बाईसाहेबही म्हणतील की आता हे घाव भरणार नाहीत पण संसारात मग्न झालो म्हणून हे घाव रुजले जातात. मूर्च्छितअवस्था आहे ना ही! मोहामुळे मूर्च्छितअवस्था आहे. मोहामुळेच घाव भरले जातात. घाव जर भरले नाही तर वैराग्यच येईल ना?! मोह कशाला म्हणतात? सर्व अनुभव घेतले असतील तरीही विसरून जातात. डायवोर्स घेताना नक्की करतात की आता कुठल्याही स्त्रीशी लग्न करायचे नाही, तरीही पुन्हा बस्तान मांडतात! प्रश्नकर्ता : मी त्यांना सांगत होतो की आपल्या वैवाहिक जीवनात नव्याण्णव टक्के विजोड (असा जोडा जो एकमेकांना अनुरूप नाही) आहेत. दादाश्री : कलियुगात ज्यांना विजोड म्हटले जाते ना ती जोडी एकतर उच्चगतिला जाते किंवा एकदम अधोगतित जाते. दोघांपैकी एक
SR No.030129
Book TitlePati Patnicha Divya Vyavhar
Original Sutra AuthorN/A
AuthorDada Bhagwan
PublisherDada Bhagwan Aradhana Trust
Publication Year2014
Total Pages126
LanguageMarathi
ClassificationBook_Other
File Size1 MB
Copyright © Jain Education International. All rights reserved. | Privacy Policy