SearchBrowseAboutContactDonate
Page Preview
Page 21
Loading...
Download File
Download File
Page Text
________________ पति-पत्नीचा दिव्य व्यवहार दादाश्री : भयंकर अज्ञानता! त्यामुळे संसारात जगता येत नाही. मुलाचा बाप होता येत नाही. पत्नीचा पती होता येत नाही. जीवन जगण्याची कलाच येत नाही. हे तर सुख असून सुद्धा सुख भोगू शकत नाही. प्रश्नकर्ता : पण वाद होण्याचे कारण स्वभाव नाही जुळत त्यामुळे ? दादाश्री : अज्ञानता आहे त्यामुळे. संसार त्याचेच नांव की जिथे कोणाचे स्वभाव कोणाबरोबर जुळतच नाही! हे ज्ञान ज्यानां मिळाले त्यांच्याकडे तर एकच रस्ता आहे, एडजस्ट एवरीव्हेर. जिथे क्लेश आहे तिथे भगवंताचा वास रहात नाही. म्हणून आपण भगवंताला सांगतो की, साहेब तुम्ही मंदिरातच रहा, माझ्या घरी येऊ नका! आम्ही मंदिर बनवू पण तुम्ही घरी येवू नका. जिथे क्लेश नाही तिथे भगवंताचा वास नक्की आहे त्याची तुम्हाला मी गॅरेन्टी देतो. क्लेश झाला की भगवंत निघून जातात. आणि भगवंत निघून गेल्यावर लोक आपल्याला काय सांगतात की धंद्यात काही बरकत होत नाही, अरे भगवंत निघून गेले त्यामुळे बरकत होत नाही. भगवंत जोपर्यंत आहेत तोपर्यंत धंद्यात फायदा वैगेरे सर्व काही होत असतो. तुम्हाला आवडतो का क्लेश? प्रश्नकर्ता : नाही. दादाश्री : तरी पण होऊन जातो ना? प्रश्नकर्ता : कधी-कधी. दादाश्री : तर ही दिवाळी पण कधी कधीच येते ना, दररोज थोडी येते! प्रश्नकर्ता : नंतर पंधरा मिनिटात थंड होऊन जाते. वादविवाद बंद होऊन जातात. दादाश्री : आपल्यातून क्लेश काढून टाका. ज्यांच्या घरात क्लेश आहे, तिथून मनुष्यपणा निघून जातो. खूप पुण्याईने मनुष्यजीवन प्राप्त होते. ते ही हिन्दुस्थानातील मनुष्यपणा, आणि ते ही पुन्हा इथे (अमेरिकेत), हिन्दुस्थानात शुद्ध तूप शोधतात तरी सुद्धा मिळत नाही आणि तुम्हाला तर
SR No.030129
Book TitlePati Patnicha Divya Vyavhar
Original Sutra AuthorN/A
AuthorDada Bhagwan
PublisherDada Bhagwan Aradhana Trust
Publication Year2014
Total Pages126
LanguageMarathi
ClassificationBook_Other
File Size1 MB
Copyright © Jain Education International. All rights reserved. | Privacy Policy