SearchBrowseAboutContactDonate
Page Preview
Page 32
Loading...
Download File
Download File
Page Text
________________ पाप-पुण्य श्रीमंती कोणाला मिळते? काय केले तर श्रीमंती येते? लोकांची कितीतरी हेल्प केली असेल तेव्हा लक्ष्मी आपल्याकडे येते! अन्यथा लक्ष्मी येत नाही. लक्ष्मी तर देण्याची इच्छा असणाऱ्याकडेच येते. जो दुसऱ्यांसाठी झिजतो, धोका खातो, नोबेलिटीचा उपयोग करतो, त्याच्याजवळ लक्ष्मी येते. खरे तर निघून गेली असे वाटते, पण परत तिथेच येऊन उभी राहते. प्रश्नकर्ता : आपण लिहिले आहे की, जो कमवतो तो मोठे मन असलेलाच कमवतो. देण्या-घेण्यामध्ये जो मोठे मन ठेवतो तोच कमाई करतो. बाकी, संकुचित मनाचा कधीच कमवत नाही. दादाश्री : हो, सर्व प्रकारे नोबल असेल तर लक्ष्मी तिथे जाते. ह्या पाजी कडे लक्ष्मी जाते काय? प्रश्नकर्ता : म्हणजेच पुण्यामुळे माणूस धनवान बनतो? दादाश्री : धनवान होण्यासाठी पुण्य पाहिजे. पुण्य असेल तर पैसा येतो प्रश्नकर्ता : पैशांसाठी तर लिहिले आहे ना की बुद्धीची गरज पडते. दादाश्री : नाही, बुद्धी तर नफा-नुकसान दोन्हीच दाखवते. जिथे जाल, तिथे नफा-नुकसान दाखवते. ती काही पैसे-वैसे देत नाही. बुद्धीने जर पैसे मिळाले असते ना तर या भुलेश्वरमध्ये (मुंबईचा एक परिसर) इतके सारे बुद्धीशाली मुनीम आहेत, शेठला जे समजत नाही ते सर्व त्याला समजते, पण बिचाऱ्याची चप्पल मागून अर्धी घासलेली असते आणि शेठ तर साडे तीनशे रुपयांचे बुट घालून फिरतो, तरीही बावळटच असतो! पैसा कमवण्यासाठी पुण्याची गरज आहे, बुद्धीने तर उलट पाप बांधले जाते. बुद्धीने पैसा कमवायला जाल तर पाप बांधाल. माझ्यात बुद्धी नाही म्हणून पाप बांधले जात नाही. आमच्यात बुद्धी एक सेंट परसेंटही नाही. (शंभर टक्के नाही).
SR No.030128
Book TitlePaap Punya
Original Sutra AuthorN/A
AuthorDada Bhagwan
PublisherDada Bhagwan Aradhana Trust
Publication Year2015
Total Pages90
LanguageMarathi
ClassificationBook_Other
File Size1 MB
Copyright © Jain Education International. All rights reserved. | Privacy Policy