SearchBrowseAboutContactDonate
Page Preview
Page 89
Loading...
Download File
Download File
Page Text
________________ ७६ कर्माचे विज्ञान नेहमीच, कोणत्याही कार्याचा पश्चाताप कराल, तर त्या कर्माचे फळ बारा आण्यांपर्यंत नष्ट होऊनच जाते. (त्या कार्याचे फळ ७५ टक्के नष्ट होते) मग जळालेली दोरी असते ना त्याच्यासारखे फळ मिळते. ती जळालेली दोरी पुढील जन्मी अशी हळूच कुंकर मारली, तर उडून जाते. कोणतीही क्रिया अशीच व्यर्थ तर जातच नाही. प्रतिक्रमण केल्याने ती दोरी जळते, पण पीळची डिझाईन तशीच रहाते. मग पुढील जन्मी काय करावे लागते? सहज असे केले, झटकली की उडून गेली. जप-तपने कर्म बांधले जाते की संपते? प्रश्नकर्ता : जप-तपने कर्म बांधले जाते की संपते? दादाश्री : त्याच्यात तर कर्म बांधलेच जाईल ना! प्रत्येक बाबतीत कर्मच बांधले जाते. रात्री झोपून गेलात तरी कर्म बांधले जाते आणि जपतप केले, त्यात तर मोठे कर्म बांधले जाते. पण ते पुण्याचे बांधले जातात. त्यामुळे पुढील जन्मी भौतिक सुख मिळते. प्रश्नकर्ता : तर कर्म संपवण्यासाठी धर्माची शक्ति किती? दादाश्री : धर्म-अधर्म दोन्हीही कर्म संपवून देतात. सांसारिक बांधलेल्या कर्मांना, जर विज्ञान असेल तर कर्माला त्वरित नष्ट करून देते. विज्ञान असेल तर कर्मांचा नाश होतो. धर्माने पुण्यकर्म बांधले जातात आणि अधर्माने पापकर्म बांधली जातात आणि आत्मज्ञानाने कर्म नष्ट होतात, भस्मीभूत होऊन जातात. ___ प्रश्नकर्ता : धर्म आणि अधर्म, दोन्हींना संपवत असेल तर त्याला धर्म कसे म्हणता येईल? दादाश्री : धर्माने पुण्याचे कर्म बांधले जाते आणि अधर्माने पापकर्म बांधले जाते. आता कोणी थोबाडीत मारले तर काय होईल? कोणी तुमच्या थोबाडीत मारले तर तुम्ही काय कराल? त्याला दोन वाजवाल ना! डबल करून द्याल. नुकसान केल्याशिवाय देतात, डबल करून. तो तुमच्या पापाचा उदय झाला, म्हणूनच त्याला तुमच्या थोबाडीत
SR No.030119
Book TitleKarmache Vignan
Original Sutra AuthorN/A
AuthorDada Bhagwan
PublisherDada Bhagwan Aradhana Trust
Publication Year2011
Total Pages94
LanguageMarathi
ClassificationBook_Other
File Size1 MB
Copyright © Jain Education International. All rights reserved. | Privacy Policy