SearchBrowseAboutContactDonate
Page Preview
Page 29
Loading...
Download File
Download File
Page Text
________________ भावना सुधारे जन्मोजन्म ते काय म्हणेल की माझ्याशी तुला काय तक्रार आहे? रेड्याच्या चुकी मुळे पखाल्याला सजा ! अरे, जीभेला(स्वादला) काय चिटकून पडायचे असते? चूक रेड्याची आहे. रेड्याची चूक म्हणजे अज्ञानताची चूक. प्रश्नकर्ता : पण समरसी आहार म्हणजे काय? याच्यात सारखा भाव कशा प्रकारे पडतो? दादाश्री : तुमच्या लोकांची जी जात(समाज) असेल, त्या जातिच्या भोजन समारंभा मध्ये जे जेवण बनवितात, ते तुमच्या जातिच्या लोकांना समरसी वाटेल तसे बनवितात परंतु तेच जेवण जर दुसऱ्या जातिचा लोकांना जेवायला दिले तर त्यांना ते समरसी नाही वाटणार. तुम्ही लोक मिरचीबिरची कमी खाणारे. समरसी आहार प्रत्येक ज्ञातिचे वेगळे वेगळे असते. समरसी आहार म्हणजे टेस्टफूल, चविष्ट फूड. मिरची जास्त नाही, अमूक जास्त नाही, सर्व सारख्या प्रमाणांत घातलेल्या वस्तु. कित्येक म्हणतात, 'मी फक्त दूध पिऊन पडून राहीन.' त्याला समरसी आहार नाही म्हणायचे. समरसी म्हणजे सहा प्रकारची रस एकत्र करून खावे चांगल्या प्रकारे, स्वादिष्ट करून खाणे. दुसरे कडू नाही खाल्ले जात तर कारले खा. कंटोळी खा, मेथी खा पण कडू सुद्धा घेतले पाहिजे. कडू नाही घेत, म्हणून तर सर्व रोग होतात. त्यामुळे मग 'क्विनाईन' (कडू औषध) घ्यावी लागते ! तो रस कमी घेतात म्हणून ही उपाधि होते ना ! अर्थात् सर्व रस घेतले पाहिजे. प्रश्नकर्ता : म्हणजे रस घेण्यासाठी शक्ति मागायची की दादा भगवान ! मला समरसी आहार घेण्याची शक्ति द्या. दादाश्री : होय, ते तर तुम्ही शक्ति मागायची. तुमची भावना काय आहे? समरसी आहार घेण्याची तुमची भावना झाली तो तुमचा पुरुषार्थ. आणि मी शक्ति दिली म्हणजे तुमचा पुरुषार्थ झाला मजबूत ! प्रश्नकर्ता : कोणत्याही रसात लुब्धपणा नाही झाला पाहिजे, ते पण बरोबर आहे?
SR No.030107
Book TitleBhavna Sudhare Janmo Janm
Original Sutra AuthorN/A
AuthorDada Bhagwan
PublisherDada Bhagwan Aradhana Trust
Publication Year2013
Total Pages54
LanguageMarathi
ClassificationBook_Other
File Size1 MB
Copyright © Jain Education International. All rights reserved. | Privacy Policy