SearchBrowseAboutContactDonate
Page Preview
Page 23
Loading...
Download File
Download File
Page Text
________________ स्त्रीशिक्षणाचे जे आदर्श घालून दिले होते ते स्त्रीसाक्षरतेच्या रूपाने जैन समाजाने आधुनिक काळापर्यंत पुढे चावलेले दिसतात. ५) स्थानांगसूत्रात दीक्षाग्रहणाची १० कारणे नोंदविलेली आहेत. त्यात उत्कट वैराग्यभावना हे एक कारण असून बाकीची कारणे कौटुंबिक, आर्थिक व सामाजिक आहेत. विनापत्य, निराधार, निर्धन, परित्यक्त्या अथवा विधवा अशा स्त्रियांना जैन धर्माने श्राविका अथवा साध्वी बनून धार्मिक जीवन जगण्याचा पर्याय उपलब्ध करून दिलेला दिसतो. त्यामुळे त्यांना समाजात एक आदरणीय स्थान मिळत असे. ६) मध्ययुगीन आणि अर्वाचीन जैन साहित्यात जैन स्त्रीने पतीच्या चितेवर आरूढ होण्याचे उल्लेख अपवादात्मक रीतीने सुद्धा आढळत नाहीत. 'अहिंसाव्रत' केंद्रस्थानी असलेल्या जैन परंपरेने या निघृणतेला कधीच थारा दिला न्ही. जैनांनी 'सती' हा शब्द वेगळ्याच अर्थाने वापरला. अत्युच्च कोटीचे धार्मिक जीवन जगणाऱ्या स्त्रियांचा 'सती' म्हणून गौरव केलेला दिसतो. जैन परंपरेत अशा १६ सती सुप्रसिद्ध आहेत. ७) स्वेच्छा व निर्धारपूर्वक धार्मिक मृत्यू अर्थात् संलेखनेचे (संथाऱ्याचे) उल्लेख सर्व जैन साहित्यात विपुलतेने दिसतात. असे मरण स्वीकारण्याचा अधिकार जैन साध्वींना आणि श्राविकांनाही आजतागायत आहे असे आढळून येते. ८) शासनदेवता, प्रत्येक तीर्थंकरांच्या यक्ष आणि यक्षिणी, सोळा विद्यादेवता, ५६ दिक्कुमारी, सर्व देवलोकातील देवी, कुलदेवता, डाकिनी-शाकिनी इ. दुष्ट देवता, श्रुतदेवी, सरस्वती अशा अनेकविध रूपांनी जैन परंपरेत खतांचा समावेश केलेला दिसतो. या देवतांना मान्यता देण्यामुळे जैनांचा स्त्रीशक्तीवरचा विश्वास, स्त्रीचे सामर्थ्य व गौरधावना व्यक्त झालेली दिसते. प्रत्यक्ष आचारव्यवहारात आणि विविध चित्रे व शिल्पांमध्ये विशिष्ट देवतांना सन्मानपूर्वक स्थान दिलेले आढळते. ९) जैन कथासाहित्यात स्त्रीअपत्य जन्माला आल्याचे दुःख व्यक्त केलेले दिसत नाही. कन्यांचा जन्मोत्सव इ. विधीही उत्साहपूर्वक पार पाडलेले दिसतात. अपत्यहीन स्त्रीपुरुष नवस बोलताना मला अगर कन्या होऊ दे' अशी इच्छा व्यक्त करताना दिसतात. “मृत्यूनंतर पुत्राने केलेल्या पिंडदान, श्राद्ध, तर्पण इ. विधींनी पितर मुक्त होतात' अशी जी दृढ हिंदू धारणा अनेक धर्मग्रंथातून व्यक्त झालेली दिसते, त्यामुळे हिंदू परंपरेत पुत्रप्राप्तीला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले. जैन सिद्धांतानुसार मात्र प्रत्येक जीव स्वतंत्र आहे. तो स्वत: विवेक व निर्धारपूर्वक स्वत:च स्वत:ची आध्यात्मिक प्रगती करून घेतो. त्यासाठी त्याला पुत्राचे प्रयत्न उपयोगी पडत नाहीत. या सैद्धांतिक मान्यतेमुळे जैन परंपरेत पुत्रप्रप्तीचे महत्त्व, त्यासाठी केलेले प्रयत्न यांना स्थान दिसत नाही. अर्थातच स्त्री व पुरुष दोन्हीही अपत्यांचा समानतेने आनंपूर्वक स्वीकार केलेला दिसतो. १०) जैन साधुसंघात आचार्य, उपाध्याय इ. पदाधिकारी दिसतात. जैन साध्वीसंघात मात्र प्रवर्तिनी, आर्या, आर्यिका, गणिनी, महत्तरा अशी पदे दिसतात. साध्वी स्त्रियांचा उल्लेख आचार्या, उपाध्यायिनी अशा प्रकारे केलेला दिसत नाही. व्यवहारसूत्र, कल्पसूत्र इ. ग्रंथांमधून वंदनेविषयीचे नियम सांगताना स्त्रियांना दिलेले दुय्यम स्थान अशिय स्पष्टतेने दिसते. तेथे म्हटले आहे की, 'पाच वर्षे दीक्षापर्याय असलेल्या साधूलाही साठ वर्षे दीक्षापर्याय असलेल्य साध्वीने वंदना केली पाहिजे. कारण सर्व तीर्थंकरांच्या तीर्थात धर्म हे पुरुषप्रधान असतात.' आजही जैन साधुसाध्वं
SR No.009841
Book TitleJain Vidyache Vividh Aayam Part 01
Original Sutra AuthorN/A
AuthorNalini Joshi
PublisherNalini Joshi
Publication Year2011
Total Pages28
LanguageMarathi
ClassificationBook_Other
File Size109 MB
Copyright © Jain Education International. All rights reserved. | Privacy Policy