SearchBrowseAboutContactDonate
Page Preview
Page 137
Loading...
Download File
Download File
Page Text
________________ HASHA M (१२४) प्रकरण तिसरे अर्धमागधी आगमामध्ये भावनेचे विवेचन भगवान महावीरांद्वारे उपदिष्ट आगमांना 'अंग आगम' म्हणतात. ते बारा आहेत. यारावे दृष्टिवाद' नावाचे अंग उपलब्ध नाही. अकरा अंगसूत्रांमध्ये भावनेचे क्रमाने चन प्राप्त होत नाही. परंतु अंशिक रूपात वेगवेगळ्या प्रसंगी भावना अथवा अनुप्रेक्षा प्राध्या रूपात वर्णन प्राप्त होते. अंग आणि उपांग आगमांमध्ये भावनेचा अथवा अनुप्रेक्षेचा उल्लेख झाला आहे, हो येथे थोडक्यात दिला आहे. आचारांग सूत्रामध्ये भावना आचारांग सूत्राच्या प्रथम श्रुतस्कंधात अनित्यभावनेचे भाव व्यक्त करताना लिहिले आहे, 'धीर पुरुषाने मुहुर्तभरपण प्रमाद करू नये, अवस्था व्यतित होत आहे, यौवन निघून जात आहे.'१ ह्याच श्रुतस्कंधात दुसऱ्या अधययनात अशरण भावनेचा उल्लेख झाला आहे. याचा आशय असा आहे की, 'जे स्वजनाच्या स्नेहामध्ये बद्ध आहेत, जखडलेले आहेत ते त्राण अथवा शरण देऊ शकत नाहीत आणि त्यांनीही आपण शरण देण्यास समर्थ नाही २ प्रत्येक जण आपल्या कर्मानेच दुःखी होत आहे. ह्या अध्ययनाच्या पाचव्या उद्देशकामध्ये एके ठिकाणी लोकभावनेचा संकेत प्राप्त होतो. तेथे 'लोक'ची विपश्यना करणाऱ्या साधकाला 'आयतचक्षू अर्थात चिंतनशील राधक' म्हटले आहे, जो लोकदर्शी आहे तो लोकाच्या उर्ध्व भागाला जाणतो, अधोलोकाला जाणतो, तिर्यग् (तिरछ्या-मध्य) भागाला जाणतो.२ _ ह्याच्या चतुर्थ अधययनाच्या दुसऱ्या उद्देशकामध्ये आस्रवामध्ये पडलेले कसे रसवामध्ये प्रवृत्त होतात आणि परिस्रवाच्या वेळीही लोक कसे फसतात ह्याचे वर्णन आहे. अर्थात जे आस्रव आहे ते कर्मबंधाला कारण आहे. तेच भावनेच्या पवित्रतेमुळे पारनव अर्थात कर्मनिर्जरेला कारण होते. जेवढी कारणे संसारबंधाची आहेत, ती सर्व कारणे भावना बदलल्या की संसारमुक्तीला कारण होतात. परंतु कित्येकवेळा असे घडते की जे CoriansaANES ena VISORM
SR No.009230
Book TitleJain Darshan Bhavna Part 01
Original Sutra AuthorN/A
AuthorPunyasheelashreeji
PublisherSanskrit Pragat Adhyayan Kendra
Publication Year2004
Total Pages408
LanguageMarathi
ClassificationBook_Other
File Size131 MB
Copyright © Jain Education International. All rights reserved. | Privacy Policy